खासगी बस ट्रॅव्हल्स वाल्याकडून प्रचंड वाढ ,प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रत्येक सणासुदीला व गर्दीच्या हंगामात खासगी ट्रॅव्हल्स बस चालकांकडून मोठ्या प्रमाणावर दरवाढ केली जात असून आता गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासगी बस ट्रॅव्हल्स वाल्यांनी प्रचंड दरवाढ केली आहे.अशा भाडेवाढीबाबत तक्रारी आल्यास खातरजमा करून कारवाई केली जाईल अशी परिवहन खात्यानी भूमिका घेतली आहे.
गणपती उत्सवासाठी चाकरमानी मोठय़ा प्रमाणात कोकणात येत असतात यामुळे रेल्वे,एसटी बसेस यांची यंत्रणा देखील अपुरी पडते.याचा फायदा घेत खासगी बस ट्रॅव्हल्स त्यांच्या तिकीट दरात या काळात मोठी वाढ करतात.खाजगी ट्रॅव्हलचे मुंबई ते रत्नागिरी साध्या बसचे भाडे ३००ते७००होते आता ९००ते११००करण्यात आले आहे.तर या मार्गावरील वातानुकूलित स्लीपर बसचे भाडे पूर्वी अंदाजे६०० रुपये होते ते आता तेराशे ते पंधराशे करण्यात आले आहे.एसटीच्या या मार्गावरील मुंबई ते रत्नागिरीचे भाडे शिवशाहीचे ६७०तर साध्या बसचे भाडे ४२० रुपये आहे. मुंबईहून सिंधुदुर्गाकडे जाणाऱया खासगी बस ट्रॅव्हलचे पूर्वीचे भाडे सहाशे ते बाराशे होते. ते आता सीजनमध्ये एसी गाडीचे आठशे ते नऊशे, स्लीपरचे अठराशे ते दोन हजार दोनशे पर्यंत आकारण्यात येत आहे.एसटीच्या शिवशाहीचे मुंबई ते मालवण सातशे पन्नास रुपये तर साध्या बसचे चारशे पन्नास रुपये तिकीट आहे. एकूणच हंगामाचा फायदा घेत खासगी बस ट्रॅव्हल चालकांनी प्रचंड दरवाढ केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button