
कोकण चे पाणी मराठवाड्यात जाताना कोकणातील सर्व भागांना या पाणी प्रकल्पाचा लाभ व्हावा-ॲड.दीपक पटवर्धन
कोकण चे पाणी मराठवाड्यात जाताना कोकणच्या ज्या ज्या भागातून पुढे जाईल त्या प्रत्येक भागाच्या पाण्याची गरज परिपूर्ण करत ही योजना परिपूर्ण होउदे या योजनेचे स्वागत करूया असे आव्हान भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
कोकणातले पाणी मराठवाड्यापर्यंत नेण्याची कल्पना भगिरथा सारखी आहे. या उपक्रमाचे डोळस पणे स्वागत करूया. प्रचंड पाऊस पडून ही कोकणात पाणी पुरवठ्याचा प्रश्न बिकट आहे.ही वस्तूस्थिती स्वीकारून मा. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करू या.ही योजना कार्यान्वित होणार असेल तेव्हा हे पाणी एअरलिफ्ट होणार नाही. विविध भागातून ते पुढे जाईल या प्रक्रियेत कोकणातल्या सर्व भागात हे पाणी पोचवण्याचा आग्रह धरून मराठवाड्या कडे पाणी जाताना मध्ये येणाऱ्या कोकणातील सर्व भागांना या पाणी प्रकल्पाचा लाभ व्हावा अशी आग्रही मागणी आपण मा. मुख्यमंत्री महोदयांकडे करत आहोत.
कोकणचे फुकट जाणारे पाणी जर उपयोगात येत असेल तर दातृत्व गुण ठासून भरलेली कोकणची जनता या उपक्रमाचे स्वागत करेल पण मराठवाड्याची तहान तृप्त होत असताना ही पाणी योजना कोकणालाही सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी तिचा उपयोग होण्यासाठी येथील जनतेने तसेच लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घेऊन या उपक्रमाचा लाभ कोकणाला मिळावा यासाठी जागृत पणे पाठपुरावा करू या असे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com