
रत्नागिरीत आयुष मंत्रालयातर्फे आयुर्वेदिक हॉस्पिटल सुरू करण्याची ऍड. विलास पाटणे यांची मागणी
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरात आयुष मंत्रालयातर्फे आयुर्वेदिक हॉस्पिटल सुरू करावे अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते ऍड. विलास पाटणे यांनी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचेकडे केली आहे. आयुष मिशनतर्फे देशभरात गेल्यावर्षी ५० हॉस्पिटल सुरू करण्यात आली असून ३५ हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. रत्नागिरीत ५० बेडचे हॉस्पिटल सुरू करण्याची योजना असून हॉस्पिटलच्या बांधकाम व फर्निचरसाठी ९ कोटी, औषधे व उपकरणासाठी ३० लाख, तर आस्थापना व व्यवस्थेसाठी १ कोटी २० लाखाची तरतूद आयुष मंत्रालयाने केली आहे. यामुळे रत्नागिरीत हे हॉस्पिटल सुरू करावे अशी पाटणे यांनी मागणी केली असून रत्नागिरीतील हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न खा. विनायक राऊत यांच्यामार्फत सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऍड. पाटणे यांची मागणी श्रीपाद नाईक यांनी मान्य केली आहे. मात्र यासाठी सर्वांनी पाठपुरावा करून हे हॉस्पिटल रत्नागिरी येथे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे पाटणे यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com