
ग्रामपंचायतींना ऑनलाईन करण्यासाठी दिलेले कॉम्प्युटर पडलेत बंद
रत्नागिरी :ग्रामीण भाग ऑनलाईन पद्धतीने राज्याशी व केंद्राशी जोडला जावा या हेतूने ग्रामपंचायतींना ऑनलाईन करण्यासाठी आपले सरकार योजनेतून देण्यात आलेले अनेक कॉम्प्युटर आता बंद पडले आहेत. त्यामुळे या योजनेचा हेतू तर साध्य होत नसून दिलेल्या कॉम्प्युटरच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत २, आपले सरकार योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना कॉम्प्युटर देण्यात आले होते. ज्या ग्रामपंचायती ऑनलाईन करण्यात येण्यासाठी अद्यावत यंत्रणा देण्यात आली होती. मात्र शासनाने दिलेल्या कॉम्प्युटरपैकी अनेक ग्रामपंचायतींचे कॉम्प्युटर बंद पडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींना व ग्रामस्थांना या प्रणालीचा उपयोग करता येत नाही. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे कॉम्प्युटर दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. लाखो रुपये खर्चुनही कॉम्प्युटरची अशी अवस्था झाल्याने त्याच्या दर्जाबाबत आता शंका व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com