गणपतीपूर्वी जगबुडी नदीवरील नवीन पुलावरून वाहतूक सुरू करा – पालकमंत्री रवींद्र वायकर
गणपती उत्सवासाठी रत्नागिरी व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येणार असून गणपती उत्सवाच्या आधी जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे काम पूर्ण करावे व हा पूल चाकरमान्यांसाठी सुरू करावा असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले आहेत पूरग्रस्त स्थितीचा आढावा घेणारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली
रत्नागिरी जिल्ह्यात सतराशे मीटर लांबीचे पुलाचे पोचरस्ता खराब झाले आहेत तसेच ६९४किमीचा रस्ता दुरुस्ती व खड्डे भरणे अपेक्षित आहेत अनेक पूलही नादुरुस्त झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले यासाठी निधी लागणार आहे त्याचे प्रस्ताव करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
www.konkantoday.com