
रत्नागिरी जिल्ह्यातील पुरग्रस्तांना शासनातर्फे उचित मदत करणार- पालकमंत्री वायकर
मागील काही आठवड्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात पडणार्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून येथील अनेक रहिवाशांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्व पुरग्रस्तांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शासनाकडून योग्य ते सहाय्य करण्यात येईल, असे रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगतिले. रत्नागिरी जिल्ह्यात पडणार्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील अनेक घरांचे, दुकानांचे, रस्ते, साकव, पुल, गुरे, शेतीचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचा परिपुर्ण आढावा घेण्यात संबंधित अधिकार्यांसमवेत १५ ऑगस्ट रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत आढावा घेतल्यानंतरच विविध तालुक्यांचे विस्कळीत झालेले जनजिवन पुर्ववत करण्यासाठी कृती आराखडा तयार करुन त्या त्या तालुक्यातील नुकसानग्रस्तांना शासनातर्फे मदत करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून वेळप्रसंगी मुख्यमंत्री यांच्या समवेतही चर्चा करण्यात येईल, असे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी कळविले आहे.
www.konkantoday.com