मुरूगवाड्यातील रस्ता वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान, स्वाभिमान पक्षाची चौकशीची मागणी

रत्नागिरी ः मुरूगवाडा मिर्‍या येथे मेटीटाईम बोर्डाच्या जागेत रत्नागिरी नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला डांबरी रस्ता भर पावसात बांधण्यात आला. जून महिन्यात बांधण्यात आलेला हा रस्ता पंधरा वीस दिवसाने आलेल्या अतिवृष्टीत बंधारा फुटल्याने वाहून गेला. या सर्व प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते नित्यानंद दळवी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदनात अनेक प्रश्‍न उपस्थित केले असून त्यामध्ये रस्त्यासाठी कोणता निधी खर्च केला, रस्त्यावर खर्च करण्यात आलेली जागा नगर परिषदेच्या मालकीची आहे का? तसेच शासनाचा रस्त्याचे डांबरीकरण करताना १० मे पूर्वी करावे असा नियम असताना येथे डांबरीकरण कसे केले गेले याची कायदेशीर चौकशी होवून अधिकार्‍यांवर कारवाई करून दोषी असणार्‍यांकडून वसुली करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button