
शहरातील मोबाइल टॉवरवर कारवाई करा स्वाभिमान पक्षाची मागणी
शहरातील सर्व मोबाईल टॉवरवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमान पक्षातर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. स्वाभिमानचे प्रवक्ते नित्यानंद दळवी यांनी निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे निवेदन दिले आहे नुकतीच शहरातील साळवी स्टॉप येथे रुग्णालयात असलेल्या इमारतींवरील टॉवरच्या जनरेटरला आग लागण्याचा प्रकार घडला होता. नगरपालिका क्षेत्रातील काही इमारतीवर असलेल्या विविध कंपन्यांचे टॉवर काढण्याचे आदेश नगरपालिकेला द्यावेत अशी मागणी स्वाभिमान पक्षाने केली आहे.
www.konkantoday.com