रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाने आता काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने रत्नागिरी चिपळूण ,राजापूर व जिल्ह्यातील अन्य भागातील जनजीवन हळू पूर्ववत होत आहे. चिपळूण व राजापूर येथील पूर ओसरला आहे. रत्नागिरी शहरासह रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोलची टंचाई निर्माण झाली होती परंतु आज सकाळी काही पंपावर पेट्रोल उपलब्ध झाले आहे. उर्वरित पंपांवरही पेट्रोल उपलब्ध होत आहे. सध्या दूध व भाजी यांची कमतरता जाणवत असली तरी या दोन दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल.आंबा घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली असल्याने पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क जोडला गेला आहे.संपूर्ण जिल्ह्यात सध्या तरी पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button