टिळक जन्मस्थळाचा दुरूस्तीचा प्रस्ताव लाल फितीत अडकला

रत्नागिरी ः स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे ठणकावून सांगणार्‍या लोकमान्य टिळकांच्या रत्नागिरीतील जन्मभूमी मूळ स्वरूपात जतन करण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव करण्यात आला होता परंतु हा प्रस्ताव शासकीय लाल फितीत अडकला आहे. टिळक आळीतील टिळक जन्मस्थानाला भेट देण्यासाठी देश विदेशातील हजारो पर्यटक येत असतात. अनेक वर्ष असलेल्या या वास्तूची मूळ रचना कायम ठेवून त्याची दुरूस्ती केली जाणार असून ही वास्तू पुरातन वास्तू म्हणून जतन केली जाणार आहे. या जन्मस्थळाच्या दुरूस्तीसाठी अडीच कोटींचा प्र्रस्ताव तयार करण्यात आला. त्यामध्ये भिंती, छप्पर दुरूस्ती व आतील अनेक माकांची दुरूस्ती करून ही वास्तू जतन केली जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव पुरातत्व खात्याकडून राज्या शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु शासनाने या दुरूस्तीच्या प्रस्तावासाठी आर्थिक तरतूद केली नसल्यामुळे सध्या हे दुरूस्तीचे काम रेंगाळले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button