शिवखोल येथील जुन्या वृक्षापासून पाच कुटुंबियांना धोका, तक्रार करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष

रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील शिवखोल परिसरात १०० वर्षापासूनचा जुना वृक्ष जीर्ण अवस्थेत असून हा वृक्ष केव्हाही कोसळण्याच्या अवस्थेत असून या वृक्षाच्या परिसरात असलेल्या पाच कुटुंबियांचे जीवन धोकादायक असल्याची तक्रार या कुटुंबियाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला व रत्नागिरी नगर परिषदेला लेखी स्वरुपात कळवली आहे तसेच याबाबत मा. नगराध्यक्ष यांनाही भेटून त्यांचेसमोर वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. प्रशासनाला पत्र दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रत्नागिरीच्या न.प.मुख्याधिकार्‍यांना याबाबत धोकादायक झाड तोडण्याबाबतची कार्यवाही करावी असे आठ दिवसांपूर्वी लेखी पत्र देवूनही नगरपरिषदेने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे आजही ही कुटुंबे भीतीच्या छायेखाली जगत असून कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याआधी नगर परिषदेने तात्काळ कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button