शिर्डी येथील सरपंच परिषदेसाठी रत्नागिरीतून सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य रवाना

रत्नागिरी ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे ३१ जुलै रोजी सरपंच महापरिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे पावणेचारशेहून अधिकजण रवाना झाले. या परिषदेला रत्नागिरी तालुक्यातून १८० सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य रवाना झाले. या सर्वांचा येण्याजाण्याचा खर्च, जेवण, नाष्टा यासह ग्रामपंचायतीच्या फंडामधून करण्यात येणार आहे. शासकीय योजना चांगल्या रितीने ग्रामपंचायती पातळीवर राबविण्यात याव्यात यासाठी ही परिषद घेण्यात येणार आहे. तरीदेखील जिल्ह्यातील काही सरपंच व उपसरपंचानी या परिषदेला दांडी मारली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button