
अमावास्या असल्याने मिर्या वासीय भीतीच्या छाये खाली
दरवर्षी पावसाळा आला की मिर्या वासीय हे नेहमी भीतीच्या छायेखाली असतात. या काळात समुद्राला मोठ्या प्रमाणावर उद्याण येत असल्याने मिर्या भागातील संरक्षण बंधार्याचा भाग कोसळत असतो. या वर्षी तर आता दोन वेळा बंधार्याचा भागाला भगदाड पडले आहे. आज अमावास्या असल्याने समुद्रात मोठ्या प्रमाणावर लाटा उसळून किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता असल्याने या भागातील घरांना धोका होऊ शकतो. त्यामुळे मिर्या वासीय भीतीच्या छायेखाली आहेत.
www.konkantoday.com