
चांदेराई बाजारपेठेत पाणी भरले,रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा अलर्ट जारी
रत्नागिरी परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदेरी बाजारपेठेत पाणी भरले.चांदेराई परिसरात रात्रभर जोरदार वृष्टी झाली.त्यामुळे बाजारपेठेत असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले.रत्नागिरी शहरात सकाळपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे.प्रशासनाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे.शहरातील शाळा सोडण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com