उद्योजकांची गरज भागविण्यासाठी वाटद येथे एमआयडीसीकडून भूसंपादन होणार

रत्नागिरी ः केंद्र शासनाच्या विविध योजनांमुळे अनेक तरूण उद्योग व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसीत या तरूण उद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये १,९१२ एकर भूखंडापैकी १५४८ भूखंडाचे वाटप झाले आहे. यामुळे उद्योग व्यवसायासाठी मागणी करणार्‍या उद्योजकांना सध्या तरी जागा उपलब्ध होत नसल्याने नाराज व्हावे लागते. यासाठी रत्नागिरीत विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी वाटद येथे एमआयडीसी प्रकल्प उभा करण्याचा प्रकल्प एमआयडीसी अधिकार्‍यांनी घेतला असून यानुसार वाटद येथे ९९८ हेक्टर जागा भूसंपादित करण्यात येणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यानंतर या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार असून कोकणाकडे अनेक उद्योजक आकर्षित होवू शकणार आहेत. याचा विचार करून ही नवी एमआयडीसी निर्माण करण्यात येणार आहे.
असे असले तरी सध्या चालू असलेल्या उद्योगांची स्थिती फारशी चांगली नाही. यातील काही उद्योग चांगल्या रितीने सुरू असून उर्वरित उद्योग समस्यांना तोंड देत तग धरून उभे आहेत. तर जवळजवळ पावणेदोनशे उद्योग विविध कारणांनी बंद झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button