चिपळूण ते लांजा या  महामार्ग चौपदरीकरणांचे काम रेंगाळण्यास कंत्राटदार जबाबदार

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जिल्ह्यातील अनेक भागात चांगल्या प्रकारे सुरू आहे. चिपळूण ते लांजा या टप्प्यातील काम रेंगाळले असून या सर्वाला map कंपनी जबाबदार आहे असा आरोप म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केला आहे. ही कंपनी म्हैसकर यांची आहे. इतर ठिकाणी महामार्गाचे काम वेगाने सुरु असताना या ठिकाणी रेंगाळत काम होत असल्याने त्याचा फटका बसणार असून महामार्ग पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. सदर कंत्राटदाराची क्षमता नसताना देखील हे काम देण्यात आल्याने हे घडत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांकडे वस्तुस्थिती सांगण्यात आली आहे. जरी आता कंत्राटदार बदलण्यात आला तरी या प्रक्रियेत वेळ जाणार आहे.सध्या ठिकठिकाणी चालू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.त्यामुळे अनेक लोक रस्त्याऐवजी रेल्वेने येण्यास पसंती देत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button