
मिर्या भागात बंधारा खचला
रत्नागिरी शहराजवळील मिर्या पंधरामाड येथे संरक्षक बंधारा परत खचल्याची घटना घडली आहे. याधी काही दिवसांपूर्वी या बंधार्याचा भाग खचला होता व बाजूला असलेल्या रस्त्याचा काही भाग समुद्राच्या लाटांनी गिळंकृत केला होता. आता या बंधार्याचा काही भाग परत खचल्याने मिर्यावासीय भीतीच्या छायेत आहेत. या भागात अमावास्येला समुद्राचे मोठे उधाण येते.
www.konkantoday.com