पाचल येथील अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्यात पडून बुडून एकाचा मृत्यू.

पाचल कोंडवाडी येथील सीताराम भगवान चौगुले (वय ५५) यांचा पाचल येथील अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सीताराम चौगुले हे शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता सदर घटना घडली.पाचल कोंडवाडीतील राहिवाशी सीताराम भगवान चौगुले हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेळ्या चरण्यासाठी रानात घेऊन गेले होते.

त्या परीसरातून अर्जुना धरणाचा उजवा कळवा पुढे हरळकडे जातो. कालव्यात पाणी सोडण्यात आले असल्याने बऱ्यापैकी पाणीसाठा कालव्यात देखील आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे शेळ्या घेऊन घरी परत येत असताना सीताराम चौगुले हे पाय घसरून अचानक कालव्यात पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button