
महामार्गाच्या कामामुळे खरवते गावात नुकसान ,आमदार राजन साळवी यांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी
राजापुर (प्रतिनिधी)- मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये खरवते चाऱ्याचा पऱ्या येथे सुमारे दहा ते पंधरा मिटर उंचीचा भराव टाकण्यात आल्यामुळे तेथे मोठ्याप्रमाणावर पाणी साचले असुन धरणसदृष्य परीस्थीती निर्माण झाली आहे त्यामुळे खरवते कोदवली मधील काही घरांसह राजापुर शहराला धोका निर्माण झाला आहे .दरम्यान संबंधीत महामार्ग विभाग व कामाचा ठेका घेतलेली केसीसी कंपनी यांच्या माध्यमातुन पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरु झाले आहे .या वृत्ताची माहिती मिळताच आमदार राजन साळवी यांनी आपल्या सहकार्यांसह चाऱ्याचा पऱ्या येथे भेट दिली व उपस्थीत महामार्गाचे अधिकारी व कंपनीचे प्रतिनिधी यान्ना चांगलेच धारेवर धरले .
खरवते ,चाऱ्याचा पऱ्या येथुन अनेक वर्षे एक वहाळ वाहत असुन त्या वहाळाच्या दोन्ही बाजुने पावसाळी दिवसांत येणारे पाणी तेथील मोरीवाटे पुढे सरकते .चालु वर्षी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान या ठिकाणी सुमारे दहा ते पंधरा मिटरचा मातीचा उंच भराव टाकण्यात आला होता .शिवाय पहिल्या मोरीच्या जागी दुसरी मोरी बसविण्यात आली होती त्यामुळे अडथळा आला व वहाळाला येणारे पुराचे पाणी अडले व आजुबाजुच्या भातशेतीसह बागायतीमध्ये पसरले आहे .
हा प्रकार घडल्यानंतर संबंधीत महामार्ग विभाग व ठेकेदार यांच्यावतीने मोठमोठे पाण्याचे पंप लावुन साचलेले पाणी उपसण्याचे प्रयत्न झाले पण पाण्याचा निचरा काही होवु शकला नाही .अखेर पोकलेन सारख्या मशिनरीच्या सहाय्याने वहाळावरील मोरीमध्ये निर्माण झालेले अडथळे हटविण्याचे काम सोमवारपासुन सुरु झाले .मात्र त्यातुन किती प्रमाणात साचलेल्या पाण्याचा निचरा होईल याबद्दल साशंकता व्यक्त केल्या जात होत्या .या साचलेल्या पाण्यामुळे खरवते ,कोदवलीसह राजापुर शहराचा धोका वाढला आहे .
या घटनेची दखल घेवुन आमदार राजन साळवी, सभापती अभिजीत तेली ,उपसभापती प्रशांत गावकर ,तालुका संघटक उमेश पराडकर ,शहर प्रमुख संजय पवार,जेष्ठ शिवसैनिक महेश पाध्ये, सरपंच चौगुले,आडवली शाखा प्रमुख सूर्यकांत चव्हाण,यान्नी घटनास्थळी धाव घेवुन संबंधीत विभागाचे अधिकारी ,,डी जी कुमावत -विभागीय अभियंता नॅशनल हाय वे सब डिव्हिजन खारेपाटण ,कमल गांधी- प्रोजेक्ट मॅनेजर के सी सी बिल्डकाँन व ठेकेदाराचे प्रतिनिधी यान्ना चांगलेच धारेवर धरताना चांगलाच जाब विचारला त्यावेळी तेथे उपस्थीत असलेल्या ग्रामस्थान्नी आपले कसे नुकसान झाले आहे त्याचा पाढाच लोकप्रतिनिधी यांच्यापुढे वाचला खरवते मध्ये जी घटना घडली आहे त्याला महामार्ग बांधकाम विभाग व चौपदरीकरणाचे काम करणारी केसीसी कंपनी हे दोघेही जबाबदार असल्याचे आमदार साळवी यान्नी ठणकावले कोणत्याही परीस्थीतीत या पाण्याचा निचरा करावेत असे त्याने आदेश दिले.
www.konkantoday.com