भाजपच्या आशीर्वादाने गुजरातच्या भूमाफियासाठी नाणार प्रकल्प समर्थन मोर्चा, रत्नागिरी काँग्रेसचा गंभीर आरोप

लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या नेत्यांनी विधानसभा गृहात व नाणार प्रकल्प परिसरात फसवे मोर्चे आंदोलन करून हा प्रकल्प भाजप सरकार बरोबर संगनमत करून लोंकाच्या डोळ्यात धूळफेक करून प्रकल्प रद्द बदलाचा जीआर काढला.जनतेला फसवून निवडणुकीत मते घेऊन पुन्हा तो प्रकल्प परराज्यातील भूमाफियासाठी भाजपचे कार्यकर्ते चोरपावलांनी समर्थनार्थ मोर्चा काढून कोंकण वासीयाना फसवणूक करीत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी कोणतेही मुद्दे नसल्याने जिल्ह्यातील जनतेचे लक्ष्य विचलित करून नाणार चा प्रश्न उपस्थित केला जात आहे.हे भूमाफिये गुजरात वासीय राजकीय दलाल असून त्यांच्या फायद्यासाठीच हा प्रकल्प आणण्याचा कुटील डाव भाजपचा आहे. शिवसेनेने नाणार ग्रीन रिफायनरी ला कोणत्या पर्यावरणाचा निकषांचा अभ्यास करून ह्या प्रकल्पाला विरोध केला? तसेच मुख्यमंत्री फडणवीस नाणार प्रकल्प रद्द केला तो कोणत्या पर्यावरण च्या निकषावर रद्द केला ? असा खडा सवाल रत्नागिरी काँग्रेस तर्फे कऱण्यात आला आहे. जर रद्द केला मग फडणवीस सरकार पक्षाचे अजंडा बाजूला ठेवून आता पडद्याआड आपल्या बीजेपी कार्यकर्ते ना समर्थन मोर्चे काढायला लावणे म्हणजे तमाम कोंकण वासीयांना आणि नाणार वासीयांना विधानसभा निवडणुकीत मतांसाठी च राजकीय फायद्याची दुट्टपी भूमिका युती सरकारची आहे असा गंभीर आरोप रत्नागिरी काँग्रेस ने केला आहे.तदप्रसंगी काँग्रेस भुवन येथे महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस रुपाली ताई सावंत , विधानसभा क्षेत्र समन्वयक कपिल नागवेकर ,महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी आगाशे ,रवी खेडेकर अन्वर कादरी, प्रदीप साळवी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button