मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२०पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील हे गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. काल त्यांनी कशेडी बोगद्याची पाहणी केली. यावेळी खेडच्या आमदार संजय कदम व राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे व अधिकारी वर्ग उपस्थित होता. कशेडी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत १५०मीटर बोगद्याची खोदाई झाली आहे .बोगद्याचे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button