नवीन मध्यवर्ती बसस्थानक जोमात, तर नव्याने दुरूस्त केलेले रहाटाघर बसस्थानक कोमात.

मागील काही वर्षे प्रवासी व एसटी बसचा गजबजाट असलेल्या रहाटाघर बसस्थानक परिसरात शुकशुकाट पहावयास मिळत आहे. रत्नागिरीत अद्ययावत असे मध्यवर्ती बसस्थानक उभारण्यात आले असल्याने ग्रामीण भागातील सर्व फेर्‍या मध्यवर्ती बसस्थानकातून सोडण्यात येत आहेत. यामुळे रहाटाघर बसस्थानकाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोट्धवधींचा नियी खर्ची केल्यानंतर हे बसस्थानक ओस पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या रहाटार बसस्थानकातून सोडण्यात येत असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नवीन बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती बसस्थानकातून रत्नागिरी ग्रामीण व शहर बौहतूक एसटी फेर्‍या सोडण्यात येत आहेत, त्यामुळे पुन्हा एकवा रहाटाघर बसस्थानक ओस पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button