
रत्नागिरीत आयुष रूग्णालय उभारावे ः सामाजिक नेते राजू भाटलेकर यांची मागणी
रत्नागिरी ः सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर या जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यालाही नवे आयुष रूग्णालय मिळावे अशी मागणी भाजपचे पदाधिकारी राजू भाटलेकर यांनी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेवून केली. नाईक हे रत्नागिरी दौर्यावर आले होते. या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन नाईक यांनी दिले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतिश शेवडे, मनोज पाटणकर, डॉ. चंद्रशेखर केळकर आदीजण उपस्थित होते.
आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, योगा संवर्धनासाठी केरळच्या नॅचरोथेपी रूग्णालयाच्या धर्थीवर रत्नागिरी किनारपट्टीवर रूग्णालय उभारण्यात यावे. हे रूग्णालय फायदेशीर होईल. त्यातून पर्यटनाला चालना मिळेल असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांनी ना. नाईक यांना सुचविले.