ग्रामस्थांचा इशारा देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष ,दोषींवर कारवाईची मागणी

तिवरे धरणाला गळती लागत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे केल्या होत्या परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले ग्रामस्थांनी याबाबत पत्र देऊन यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी केली होती परंतु काम कुणी करायचे यावर केवळ चर्चा होत राहिल्या त्यानंतर केवळ तात्पुरती दुरुस्ती करून त्यावर पांघरूण घालण्यात आले या भागात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे काल अमावस्या असल्याने पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे धरण ओवरफ्लो झाले याचीही कल्पना प्रशासनाला नव्हती त्यामुळे जवळील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न झाले नाहीत धरण ओवरफ्लो होऊन फुटले आणि काही कळायच्या आत पाणी आजूबाजूच्या घरात शिरले लोकांना स्वतःला वाचवण्याची संधीही मिळाली नाही पाण्यात पंचवीस जण वाहून गेले व बेपत्ता झाले आजूबाजूच्या ग्रामस्थांना ही घटना करण्यावर त्यांनी धावपळ करून ग्रामस्थांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी प्रशासनाला करण्याचाही प्रयत्न झाला शंभर नंबरला फोन करण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला सुरुवातीला हा फोन लागला नाही आणि लागला तो कोणी उचलला नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे या सर्वाला प्रशासनाचा बेफिकीरपणा कारणीभुत असून आता जी जीवित हानी झाली आहे त्याचे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button