विजेचा धक्का बसून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील नवेदरवाडी येथे घरात विजेचा धक्का बसून मंदार मनोहर शिंदे वय 25 या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. मंदाच्या मृत्यूने नवेदर वाडीवर शोककळा पसरली आहे.
रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मंदार घरातील आतल्या खोलीत पाणी पिण्यासाठी गेला होता. खोलीत अंधार असल्याने त्याने लाईट लावला . त्याचक्षणी त्याला विजेचा मोठा धक्का बसला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
नातेवाईकांनी नाट्ये पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच नाटे पोलिस स्थनकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस कर्मचारी श्री कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता.
मंदारच्या मृत्यूचे वृत्त आडिवरे पंचक्रोशी पसरतात येथील ग्रामस्थांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली .रात्री उशिरा मंदारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या मृत्यूची नोंद नाटे पोलीसांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button