
पराभवाने खचून न जाता स्वाभिमान पक्ष जनतेचे प्रश्न सोडविणार
रत्नागिरी ः निवडणुका या होतच असतात. यश अपयश येत-जात असते. यशाने हुरळून जावू नये आणि अपयशाने खचून जावू नये हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा बाणा आहे. म्हणून येईल ते सार्वजनिक काम करूया, लोकांपुढे जाऊया, आपल्या पक्षाची भूमिका मांडूया, राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे आहे म्हणून स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया, असा निर्धार स्वाभिमान पक्षाच्या रत्नागिरी तालुका कार्यकारिणीत करण्यात आला.