
महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू,-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एरियल फोटोग्राफी करताना संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. राज्यातले हे वैभव आणि सौंदर्य डोळ्यांत मावत नाही. ते जगापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटनस्थळांचा केवळ विकास करून चालणार नाही. तर त्यांची इत्थंभूत माहिती आणि सोयी-सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील. गुंफा, गडकिल्ले, वन्यप्राणी, वाघ, समुद्रकिनारे, जंगले हे राज्याचे वैभव आहे. हे वैभव जगापर्यंत पोहोचवून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू, असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक पर्यटनदिनानिमित्त केले.
www.konkantoday.com