
होमिओपॅथी, आयुर्वेदीक कॉलेजमधील मॅनेजमेंटचा कोटा बंद करण्याचा शासनाचा निर्णय, संस्थाचालक हादरले
रत्नागिरी ः राज्यातील सर्व होमिओपॅथी आणि आयुर्वेदचा कॉलेजमधील प्रवेशासाठीचा मॅनेजमेंट कोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे संस्थापक अस्वस्थ झाले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या कोट्यातील काही जागा संस्थाचालकांना द्याव्यात, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र संस्थेची आर्थिक कोंडी करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयात बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
देशातील बहुसंख्य शिक्षण संस्था कॉंग्रेसचे नेते आणि त्यांच्या समर्थकांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे गेल्या तीन चार वर्षापासून या संस्थांवर भाजपची वक्रदृष्टी आहे.