मला जिल्हाध्यक्ष पदावरून  कोणी हीहटवू शकत नाही  -रमेश कदम

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यावर गद्दारीचे आरोप करून आपल्याला जिल्हा अध्यक्ष पदावरून काढून टाकण्याचे काही जणांचे प्रयत्न सुरू आहेत त्याची सूत्रे मुंबईतून हलवली जात आहेत जोपर्यंत मी स्वतःहून हे पद सोडत नाही तो पर्यंत कोणीही मला पदावरून हटवू शकत नाही असा जळजळीत इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश भाई कदम यांनी पक्षातील विरोधकांना दिला शहरातून आपल्याविरोधात बोंबलणाऱ्या काही कुत्र्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करावे असे कदमांनी सागितले.

निवडणुकीतील अपयशाला खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा जबाबदार असल्याचे त्याने सांगितले आपल्यावर आरोप करणारे लियाकत शहा यांच्या बडतर्फीची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येणार आहे पक्षाचे उमेदवार नवीनचंद्र बांदोडकर यांनी आपल्याकडे समाजाची साडेतीन लाख मते असल्याचा दावा केला होता हे मतदार गेले कुठे असा सवालही त्यांनी केला निवडणुकीत चिपळूणसाठी फक्त नऊ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता या निधीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील होत नाहीत पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील

Related Articles

Back to top button