आपली ईडी चौकशी होणार या भीतीनेच नारायण राणे यांनी सरळ भाजपमध्ये पळ काढला -आमदार वैभव नाईक

आपली ईडी चौकशी होणार या भीतीनेच नारायण राणे यांनी सरळ भाजपमध्ये पळ काढला असा हल्लाबोल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज केला. नारायण राणे यांना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा काडीचाही अधिकार नसल्याची टीकाही नाईक यांनी यावेळी केली. वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल अशी पुन्हा एकदा भविष्यवाणी करणाऱया राणे यांच्यावर त्यांनी टीका केली ते म्हणाले, राणे यांनी गेली १० वर्षे अनेक आव्हाने दिली आणि भविष्यही वर्तवले.
काँग्रेसमध्ये असताना मी मुख्यमंत्री होणार आणि त्यानंतर शिवसेना विसर्जित करणार अशा वल्गनाही त्यांनी केल्या.या पोपटपंचीचे पुढे काय झाले हे लोकांना चांगलेच ठाऊक आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button