
गद्दारांची लोकसभा निवडणुकीपेक्षाही वाईट स्थिती विधानसभा निवडणुकीत- विनायक राऊत
. गद्दारांनी कितीही आदळआपट केली तरी लोकसभा निवडणुकीपेक्षाही वाईट स्थिती त्यांची विधानसभा निवडणुकीत होणार आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज आहेत.मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना त्यांच्या भूतबंगल्यात गाडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय आढावा बैठक त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.