पूर्णगड किल्ला पर्यटन स्थळ म्हणून होतेय विकसित

रत्नागिरी ः रत्नागिरी शहरापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर असणारा पूर्णगड किल्ला प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. या किल्ल्याच्या डागडुजीसाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र हे काम संथगतीने सुरू असून लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग सागरी महामार्गावर आहे. सध्या या पूर्णगड किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरूस्तीचे काम सुरू आहे. गेल्या काही महिने या पूर्णगड किल्ल्याच्या दुरूस्तीला सुरूवात करण्यात आली आहे. मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर वसलेला हा पूर्णगड किल्ला पन्नास मीटर उंचीवर आहे.
पूर्णगड किल्ल्याच्या गडाच्या तटबंदीवर पोचल्यानंतर मुचकुंदी नदीची खाडी आणि अथांग सागर अतिशय आकर्षक आहे. सध्या हा किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

Related Articles

Back to top button