मच्छिमारांना क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ मिळण्याची आशा
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांचा गेल्या वर्षीचा हंगाम नुकसानीत गेला. येत्या २५ दिवसानंतर पुन्हा मासेमारी हंगाम सुरू होत आहे. परंतु बहुतांश नौका समुद्रात मासेमारीसाठी नेण्याकरिता आवश्यक असणारी आर्थिक ताकद राहिलेली नाही. अशावेळी किसान क्रेडीट कार्ड योजनेंतर्गत बँकांकडून कर्ज मिळण्याची आशा होती. मात्र मच्छिमारांसोबत बँकांच्या झालेल्या बैठकीत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने मच्छिमारांची चिंता कायम आहे. अशावेळी आमदार, खासदारांकडून प्रयत्न होवून किमान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ मिळेल अशी आशा बाळगली जात आहे.
www.konkantoday.com