महामार्गावर वाटूळ येथे क्रेटा गाडीच्या धडकेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू.
मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ धनगरवाडी येथे गोव्याहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणार्या क्रेटा गाडीने धडक दिल्याने तीन म्हैशींचा जागीच मृत्यू झाला असून एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात शेतकरी लवू गोविंद गोरे यांचे सुमारे चार लाख दहा हजाराचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.याप्रकरणी लवू गोविंद गोरे यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या अपघातात दुभत्या म्हशींचा मृत्यू झाल्याने शेतकर्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी क्रेटा चालक अमोल अनिल आचरेकर (३४, रा. गुरामवाड, कट्टा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com