मिर्या भागात गुरांच्या मृत्यूमुळे भूमिगत वीजवाहिन्यांची होणार तपासणी
रत्नागिरी शहरालगतच्या मिर्या बंदर व शिरगाव येथे भूमिगत वाहिन्यांमुळे येणार्या शॉकमुळे दोन गायी व म्हशींचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आता वरिष्ठ इलेक्ट्रीक इंजिनिअरमार्फत या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच जनावरांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.मिर्या बंदर येथे २१ जून रोजी सकाळी ७ च्या सुमारास माय व म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. महावितरण कर्मचार्यांना घेराव घालण्यात आला. यानंतर महावितरणकडून परिसराची पाहणी करण्यात आली. मात्र शॉक नेमका कसा व कुठून आला, याचा शोध लागू शकलेला नाही. त्यामुळे नेमक्या उपाययोजना काय करावी, असा प्रश्न कर्मचार्यांना पडला. या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांकडून परिसराची पाहणी करण्यात येणार आहे. संबंधित घटनेची चौकशी करण्यात येणार अस्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात सातत्याने येणार्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथे भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. जिल्ह्यात सर्वत्र भूमिगत वीजवाहिनीचे काम जोराने सुरू आहे. या भूमिगत वाहिनीमुळे गुरे दगावण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.www.konkantoday.com