गोव्याला फिरायला जाणाऱ्या चौरसिया कुटुंबियांच्या गाडीला अणूस्कुरा ओणी येथे अपघात, एका महिलेचा मृत्यू

__उत्तरप्रदेशहून पुण्याला एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आणि पुण्यावरून गोव्याला फिरायला जाणाऱ्या चौरसिया या कुटुंबियांच्या गाडीला अणूस्कुरा ओणी मार्गांवरील तालुक्यातील येळवण बागवे या ठिकाणी अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवार सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथील चौरसिया कुटुंब काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमाला उत्तरप्रदेश हून पुण्याला आले होते. त्या ठिकाणचा कार्यक्रम आटोपून गोव्याला फिरायला जाऊया असं ठरवून ते पुण्यावरून ओणी विटा महामार्गांने अणुस्कुरा पाचल ओणी असा प्रवास करीत होते. या दरम्यान ते सकाळी येळवण बागवे येथे आले असता त्यांच्या टाटा हॅरियर (गाडी क्रमांक UP 53-DM-8090) या गाडीला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून रस्त्यालगतच्या जुनाट झाडाला आदळली. गाडीत एकूण पाच प्रवाशी होते यापैकी राजरानी चौरसिया (वय 68)यांचा जागीच मृत्यू झाला. सदरची गाडी त्यांचा मोठा मुलगा शक्ती राजाराम चौरासिया (वय वर्ष 26) राहणार पुणे हे चालवत होते. ते किरकोळ जखमी झाले आहेत,तर गाडीत संजयकुमार चौरासिया (वय वर्ष 47) हे जखमी झाले असून सौ.सरिता संजय कुमार चौरासिया (वय वर्ष 42) किरकोळ जखमी तर एक चार वर्षाची लहान मुलगी किमाया चौरासिया होती.तर त्यांच्या सोबत अजून एक चार चाकी वाहन त्यांचीच दुसरी फॅमिली त्यात एकूण पाच प्रवाशी प्रवास करीत होते. त्यात मयत राजरानी चौरासिया यांचा दुसरा छोटा मुलगा तसेच मुलगी व मुलीची फॅमिली असे एकूण पाच प्रवासी प्रवास करीत होते. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाहीwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button