श्री स्वामी समर्थ फाउंडेशनच्यावतीने समाजातील विविध घटकात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ६० मान्यवरांना पुरस्कार

चिपळूण, तालुक्यातील शिरगांव येथील श्री स्वामी समर्थ फाउंडेशनच्यावतीने समाजातील विविध घटकात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ६० मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जे लोक समाजासाठी प्रामाणिक भावनेने समाजसेवेचे काम करतात त्यांना समाजातील विविध घटकांनी प्रोत्साहन द्यायला हवे, असे मत परशुराम येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शामसुंदर भाकरे यांनी व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल पेटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील विविध क्षेत्रात लौकीक मिळवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुक्यातून वैद्यकीय, शिक्षण, सांस्कृतिक, करमणूक, पत्रकार, शाळा, महाविद्यालये, शिक्षक, मुख्याध्यापक, अभियंता, गुणवंत कामगार आदी घटकांतून पुरस्कार मागवण्यात आले होते. त्याप्रमाणे १६० जणांनी माहिती पाठवली होती. पुरस्कार निवड समितीने त्यातील ६० जणांची निवड केली. निवड झालेल्या व्यक्ती व संस्थांना शिरगाव येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात गौरवण्यात आलेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button