
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 343, 129 रुग्ण बरे झाले, 13 मृत्यू
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 05 – जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 343 व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यापैकी 129 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 13 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ऍ़क्टीव्ह रुग्णांची संख्या 201 आहे. आज गुहागर येथील चार रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आज अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांपैकी 2 जणांचा मृत्यू 2 दिवसांपूर्वी झालेला आहे. यातील एक रुग्ण अंबोलगड,ता.राजापूर येथील असून दुसरा रुग्ण मांडिवली, ता. दापोली येथील आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण 9 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 8, तर गुहागर तालुक्यातील 1 व्यक्तींचा समावेश आहे.
कन्टेंनमेन्ट झोन 116 जिल्ह्यात सध्या 116 ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 15 गावांमध्ये,गुहागर तालुक्यामध्ये 8 गावांमध्ये, खेड तालुक्यात 16 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 23 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यामध्ये 2 गावामंध्ये, दापोली मध्ये 16 गावांमध्ये,लांजा तालुक्यात 8 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 11 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी - 42, उपजिल्हा रुग्णालय - 4, कळबणी रुग्णालय-4, ग्रामीण रुग्णालय गुहागर- 2, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली - 6 , कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी - 4, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर - 1 आणि कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड - 5 असे एकूण 68 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत. तसेच जिल्हयामध्ये आतापर्यंत विविध रुग्णालयात 1023 संशयित रुग्णांना दाखल करण्यात होते. त्यापैकी 955 संशयित रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
होम क्वारंटाईन संख्या घटली मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. यातील 12,120 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आज रोज होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 65612 इतकी आहे.
6 हजारांहून अधिक नमुन्यांची तपासणी जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 6 हजार 631 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 330 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 343 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 5 हजार 968 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 301 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 301 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे तर 297 अहवाल मिरज येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 04 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 18 हजार 139 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 46 हजार 505 आहे. यामध्ये रेल्वेने इतर राज्यात अथवा जिल्हयात गेलेल्यांची संख्या 10 हजार 289 आहे. परप्रांतातून आलेल्या आणि जिल्हयात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्हयात 63 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 22 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.