
कोराेनाच्या पाश्र्वभूमीवर रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता?
रत्नागिरी जिल्ह्यात अजूनहीकरोनाचा प्रभाव असल्याने रत्नागिरी जिल्हा अजूनही तिसर्या टप्प्यात आहे त्यामुळे या जिल्ह्यावर अजूनही बंधने आहेत
कोरोना महामारीची दुसरीलाटओसरत असली तरीतिसऱ्या लाटेचा धोका असल्याने प्रशासनाने खबरदारी बाळगलीआहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम, निवडणुकांवर निर्बंध
आहेत. याचा फटका रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिकनिवडणुकीला बसण्याची शक्यता आहे.२२डिसेंबरला विद्यमानसदस्यांचा कालावधी संपुष्टात येणार आहे; मात्र निवडणुकीच्या
अनुषंगाने कोणतीच प्रक्रिया सुरू नाही, अवधीही कमी राहिलाआहे. त्यामुळे नगर परिषदेवर प्रशासक नियुक्तीची दाट शक्यतानिर्माण झाली आहे. मात्र इच्छुकांनी आपली मोर्चे बांधणी सुरूठेवली आहे.रत्नागिरी पालिकेची विद्यमान सदस्यांची २२ डिसेंबरला मुदतसंपत आहे. त्यामुळे डिसेंबरला पालिकेची पंचवार्षिक निवडणूकआहे; निवडणूक आयोग निवडणूककार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे यामध्ये मतदार यादीचे पुनर्निरीक्षणकरणे, प्रभागांची फेररचना करून ते निश्चित करणे, आरक्षणसोडत कार्यक्रम घेणे ही सर्व प्रक्रिया होते;परंतु अद्याप तसे होत असल्याचे दिसत नाही कोरोनाची परिस्थिती पाहून अनेक अधिकार स्थानिक प्रशासनाला राज्य शासनाने दिले आहेत
www.konkantoday.com