वारंवार हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप अपयश
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी परिसरात बिबट्याने चौघांवर हल्ला केल्यानंतर वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कॅमेरे व पिंजऱ्याच्या माध्यमातून गेले बारा दिवस विशेष प्रयत्न करीत असून अद्यापही त्यांना यश येऊ शकलेले नाही.सध्या पावस, नाखरे आदी भागात बिबट्याचा संचार सुरू आहे. त्यामुळे वनविभाग अनेक ठिकाणी पिंजरे लावून त्यात पकडण्याकरिता प्रयत्नशील आहे. परंतु अद्यापही त्या पिंजऱ्यात असलेल्या भक्ष्याकडे दुर्लक्षित करून वनविभागाला हुलकावणी देत आहे. वनविभागातर्फे नागरिकांना ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. तसेच पंचक्रोशीत रस्त्याशेजारी फलक लावून जागृती होत आहे. वारंवार हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही.
www.konkantoday.com