
राज्यात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३ हजार १८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्यात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com