रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या मजुरांना मध्य प्रदेशमध्ये जाता यावे यासाठी आज एसटीच्या बसेस पनवेलपर्यंत रवाना

रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या कामगारांना मध्यप्रदेशमध्ये आपल्या गावी जाता यावे यासाठी एसटीने आज तीस बसेस सोडल्या या कामगारांना घेऊन या बसेस पनवेल येथे रवाना झाल्या पनवेल येथून मध्य प्रदेशला जाण्यासाठी ट्रेन सोडण्यात येणार आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील मध्य प्रदेशातील मजूर आपल्या गावी जाता यावे म्हणून वारंवार मागणी करत होते. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळ पासुन तीस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण येथील डेपोतून बसेस सोडण्यात येत आहेत.
एका बसमध्ये २२ मजूर याप्रमाणे ३० गाड्या जिल्ह्यातून सुटत असल्याची माहितीही विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन पर्यंत या गाड्या मजुरांना सोडून येणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button