आम्ही भारतीय नागरिकतर्फे महामोर्चासाठी हजारो लोक एकत्र

केंद्र सरकारने लादलेल्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात रत्नागिरीकरानी आम्ही भारतीय नागरिकतर्फे महामोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चासाठी संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आदी तालुक्यातील सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने चंपक मैदानावर उपस्थित आहेत. चंपक मैदान येथे नेत्यांचे मार्गदर्शन सुरू असून त्यानंतर हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे.

आज संविधानावर होणारा हल्ला थांबला पाहिजे. देशात जातीयता, धर्मभेद, दंगली होत आहेत त्या होवू नयेत. आजपर्यंत शांती आणि अमन हे येथे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे लोक एकत्र राहून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र आता हा कायदा लादल्याने त्याचा निषेध करण्यासाठी हे सर्वजण एकत्र आले आहेत. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना, राष्ट्रपतींना देण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button