जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने 11 लोकांना चिरडले, पहा व्हिडिओ.

मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. पण समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा दुर्दैवी अपघात जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ झाल्याची माहिती आहे.या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच 40 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे . मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावल्याने त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे काही प्रवाशांना ही आग लागल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे भयभीत झालेल्या त्या प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button