जिल्ह्यातील तीन हजार तीनशे शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू
रत्नागिरी – कोकण आयुक्तांकडे अपिल दाखल केलेल्या शिक्षकांसह तीन हजार तीनशे शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या सात वर्षे रखडल्या होत्य. यावर्षी शिक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त मिळाल. यावेळी शिक्षकांना त्यांच्या पसंतीच्या शाळा निवडण्याची संधी देण्यात आली होती.राजापूर आणि गुहागरमधील अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. बदली प्रक्रियेमुळे या शाळांना शिक्षक मिळाले आहेत. बदली झालेले सर्व शिक्षक तीन मे रोजी बदलीच्या ठिकाणी हजर झाले आहेत.