रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी ,दुबईहून खेड येथे आपल्या गावी परतलेल्या इसमाचा मृत्यू

दुबईहून खेड येथे आपल्या गावी परतलेल्या एका इसमाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.सदरची व्यक्ती काही दिवसांपूर्वी दुबई येथून खेड येथे परतली होती.यावेळी त्यांची तपासणी करण्यात आली होती परंतु त्यात कोणतेही लक्षण नसल्यामुळे दक्षता म्हणून त्यांना होमक्वारंटाइन करण्यात आले होते.त्यानंतर हा इसम आपल्या मूळ गावात होमक्वारंटाइन साठी गेला होता .त्यानंतर काही दिवसांनी कोरोणाची सदृश लक्षणे आढळून आल्याने त्यांना खेड कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यानंतर त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला होता त्याचा कोराेनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला आहे.पहिल्या तीन काेराेनाग्रस्त रुग्णां व्यतिरिक्त हा चौथा रुग्णांचा रिपोर्ट आज पॉजिटिव आला होता.यातील एक रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याला सोडण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button