रत्नागिरीत सीएनजीचा तुटवडा; वाहनांच्या व रिक्षांच्या मोठमोठ्या रांगा.

रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पंपावर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. याचा सर्वात फटका जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्‍या सीएनजीच्या वाहनांना बसत आहे.जिल्ह्यात सर्वच पंपांवर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यातील परिस्थिथी गंभीर बनली आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत आहे. उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांनासुद्धा या सीएनजीचा सामना करावा लागत आहे.

ज्या पर्यटकांच्या गाड्या सीएनजीवर चालणार्‍या आहेत. त्यांना तासनतास गॅस भरण्यासाठी रांगामध्ये उभे रहवे लागत आहे. यातच त्यांचा वेळ जात आहे. साधारण जिल्ह्यात सर्वच पंपावर किमान २ ते ३ कि.मी. पर्यंत लांबचलांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. यामुळे ४ ते ५ तास गॅस मिळवायला वेळ लागत आहे. काही वेळा नंबर येतो मात्र गॅसच संपतो, अशाही प्रसंगाला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button