पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धबंदीचे उल्लंघन? उमर अब्दुल्ला यांच्या ट्विटनंतर खळबळ


भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीनं काही तासांपूर्वीच युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. पण या कराराच्या केवळ तीन तासांतच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरु केले आहेत.सीमेवरील तीन राज्यांमध्ये पुन्हा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरु झाले असून या ठिकाणी विविध शहरांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आला आहे.जम्मू-काश्मीरच्या उधमपूर, श्रीनगर या भागांमध्ये आकाळात लाल रंगाचे गोळे उडताना दिसत आहेत. त्याचबरोबर या गोळ्यांचे स्फोट झाल्याचंही ऐकायला मिळत आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमकडून याला प्रत्युत्तरही देण्यात येत आहे. यामुळं सुरक्षेच्यादृष्टीनं या तिन्ही भागात ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे.ओमर अब्दुल्ला यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, ‘येथे कोणताही युद्धविराम झालेला नाही. श्रीनगरमध्ये हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत.’ या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.ओमर अब्दुल्ला यांच्या या ‘एक्स’ पोस्टमुळे पाकिस्तानकने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे वृत्त अनेक टीव्ही वाहिन्यांनी प्रसिद्ध केले. मात्र, भारतीय लष्कराकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. तसेच त्यावर कसलेही निवेदन जाहीर केलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button