ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे ऑपरेशन ‘बुनयान उल मरसूस’.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. भारतीय लष्कराने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले.भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची चरपड झाली. त्यामुळे भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने आपल्या मोहिमेला ‘ऑपरेशन बुनयान अल मरसूस’ असे नाव दिले.बुनयान अल मरसूसचा हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो लोखंड किंवा शिशाने उभारलेली मजबूत भिंत. परंतु पाकिस्तानच्या मजबूत भिंत किती कमकुवत आहे हे भारतीय लष्कराने दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तान तणावात भारतीय ड्रोन आणि लढाई विमाने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्ताने तीन एअरबेस नष्ट केले.भारताच्या हल्ल्याने बुनयान अल मरसूसचा या नावाची खिल्ली पाकिस्तानमध्येच उडवली जात आहे. पाकिस्तानी लष्कर भारताचे हल्ले थांबवण्यात अपयशी ठरले असल्याचे पाकिस्तानमधील पक्ष तहरीक ए इन्साफकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे हल्ले थांबवू शकत नाहीत त्यामुळे तुरंगात असलेल्या इम्रान खान यांचा सोडण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button