आपल्या विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्यात तीन दिवसांपासून कृषी सहाय्यकांचे आंदोलन.

कृषी विभागाच्या होवू घातलेल्या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीची कुंठीत अवस्था दूर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी सहाय्यक संघटनेने विविध टप्प्यात आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सर्व वाहतूक कृषी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये अडीचशे कर्मचारी सहभागी झाले आहेत.सध्या कृषी सहाय्यकांचे एकूण ११,५२७ पदे अस्तित्वात असून कृषी पर्यवेक्षकांची ७०० पदे मंजूर आहेत. त्यामुळे कृषी सहाय्यकांना सेवेचे २० ते २५ वर्षे झाल्यानंतर ही पदोन्नती मिळत नाही.

सध्या स्थितीमध्ये कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ६ः१ या प्रमाणे आहेत. ते ४ः१ याप्रमाणे करण्यात येणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी सहाय्यकांची पदोन्नतीची कुंठीत अवस्था दूर होवून त्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. या मागणीसाठी व कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रांवर कामकाज करत असताना उदभवणार्‍या विविध अडचणींची सोडवणूक करण्यात यावी, यासह विविध मागण्यांची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने सोमवारपासून संघटनेने विविध टप्प्यात सर्वत्र आंदोलन सुरू केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button